Friday, February 11, 2011

गद्य ३

एखादया गोष्टीची प्रतीक्षा केल्यापेक्षा, ती भेटली तर आणि नाही भेटली तर काय करावे यावर विचार करावा. त्याने वेळ वाचतो, मन संतुलित राहते आणि दोन्ही गोष्टींना सामोरे जाण्यास मदत होते.

परमेश्वर आहे नक्कीच आहे!- काल रात्री जेवणाच्या वेळी आई माझ्या २ वर्षाच्या पुतण्याला म्हणाली "तू ह्या ताटात बस" आणि तो उठून चक्क त्या ताटात मध्यभागी बसला. उद्विग्न असलेले माझे मन खदखदुन हसले. आपल्या निरागस भावाने दुःख विसरायला लावणारा तोच परमेश्वर कोणत्या रुपाने येईल, सांगणे कठीण.

भारतीय धर्म आणि इंग्रजी Religion यांची गफलत करू नका. निःसंशय दोन्हीही वेगळे.

एखादया कर्तृत्ववान पुरुषाला देवाचा अवतार मानणे म्हणजे त्याचे कर्तृत्व संपुष्टात आणणे. कारण देवास  काहीही अशक्य नाही.

सुख आणि दुःख यांचे काहीही अस्थित्व नाही. त्या फक्त मनाच्या दोन अवस्था. त्यामुळे सुखाने भुलून जाणे जितके अयोग्य तितकेच दुःखाने खचून जाणेही अयोग्य.

अमुक चूकीचे आणि आमूक बरोबर हे कृतीवर अवलंबून नसून ते परिस्थितीवर आहे. - पार्वती कधी काळी सती गेली तेव्हा ती बरोबर होती पण आज स्त्रीला बळजबरीने सती देणे हे चूक. कृती तीच पण परिस्थिती निराळी.

सौंदर्य हा स्त्रीचा दागिना असेल तर त्याचे प्रदर्शन योग्य ठिकाणी झालेलेच चांगले अन्यथा लुबाडले जाण्याचा धोका संभवतो.

स्त्रीच्या पेहरावाने तिचे सौंदर्य खुलत असेल तर उत्तम पण ते उघडे पडत असेल तर लज्जास्पद.

म्हातारपणी काय होईल याची चिंता वाहताना बरेच लोक दिसतात पण मृत्युनंतर काय होईल? हा ही प्रश्न पडायला हवा.

No comments:

Post a Comment