Friday, February 11, 2011

गद्य २

संपूर्ण स्वातंत्र्याचे भविष्य पारतंत्र्यापेक्षाही भयानक असते.

केलेल्या कृती पेक्षा ती कोणत्या भावनेने केली यास महत्व अधिक.- अपमानित द्रौपदी, पांडवांची पत्नी होती म्हणून युद्ध करणे चूक पण ज्या राज्यात राणीचाही अपमान होतो ते राज्य लयास जावे म्हणून युद्ध करणे योग्य.

आम्ही पाश्चिमात्यांना शून्य दिला आणि त्यांनी त्यातून विश्व निर्माण केले. आम्ही मात्र त्या दानाच्या अभिमानाचे ओझे आजही वाहतोय.

आपले सौंदर्य मोरपंखांनीच आहे हे काय मोरास ठाऊक नाही? पण त्यातून चार गळून पडतील म्हणून तो पिसारा फुलावाचा थांबवत नाही.

कबीराने चोरी करण्याच्या फंदात पडू नये अन्यथा गर्दन छाटली जाते.

पाश्चिमात्य मोठे हुशार त्यांनी आमच्या कडून ज्ञान घेतले. आम्ही मात्र कपडेच आणि तेही वितभर.

आमच्या येथील बरीच उंदरे परदेशी गेली आणि तेथील लाडू आवडला म्हणून इथल्या मातीला विसरली.

स्वभावात स्वाभाविकातेचा अभाव असल्यास जगण्यातली सहाजीकता नष्ट होते.

कर्तेपणाची जाणीव ही फल-अपेक्षेला कारण ठरते आणि त्यातून सुख किंवा दुःख यांची उत्पत्ती होते.

भविष्याची चिंता वाहण्या पेक्षा त्याचे नियोजन करणे अधिक सोयीस्कर.

No comments:

Post a Comment