Thursday, February 10, 2011

गद्य १

तारुण्यात सौंदर्याला भूलने पाप नाही, पण सौंदर्याच्या आहारी जाण्यासारखा शाप नाही.

जगायला कारण नाही म्हणून मृत्यूची अपेक्षा करणे, हा जीवनच नाही तर मृत्यूचाही अपमान आहे.

प्रसाद मागावा तो ज्ञानेश्वरांनी, आम्ही तर फक्त स्वार्थाची साखर आणि तिचा शिरा यातच समाधानी.

भूक, मग ती कोणतीही असो, पूर्ण तृप्त होता कामा नये. अपचनाचा धोका असतो.

अपूर्ण आकांक्षाना कवटाळून निवृत्त होणे म्हणजे त्याच आकांक्षांची नवीन आवृत्ती घेऊन पुन्हा जन्माला येणे.

दुरावास्थेने चून जाणे म्हणजेच दुःख.

मन मारून जगण्याने प्रगती खुंटते आणि मनास न आवरून जगण्याने अधोगती होते.

अहिंसेचा अतिरेक हा देखील हिंसेला कारण ठरतो.

देवाविषयीचा कर्मठपणा देवाजवळ तर नेत नाहीच पण माणसापासूनही दूर नेतो.

पाश्चिमात्य लोक जेव्हा आमच्या तत्त्वज्ञानावर शिक्कामोर्तब करतात तेव्हा आम्ही आमचे तत्वज्ञान मानतो. काय ही आमची दुरावस्था!


No comments:

Post a Comment